भारतीय जनतेचा ‘भावनाप्रधान खुळखुळा’ झालेला आहे. कोणीतरी भावनांना हात घालतो आणि देशभर भावनिक उद्रेकाच्या लाटा उठतात. भावना ताब्यात ठेवणारी भारतीय मानसिकता लोप पावत आहे!
गेल्या सहा वर्षांत असा एकही महिना नसेल ज्या महिन्यात एखादी नवी लाट धडकली नसेल आणि तिने भारतीय जनतेच्या मनात उलथापालथ केली नसेल. आधुनिक काळाच्या महिम्यामुळे आज आपण फेसबुक, व्हॉटसअॅप यांनी जोडले गेलो आहोत. जवळपास सगळी वर्तमानपत्रे आणि सगळ्या टेलिव्हिजन वाहिन्या आपल्या हातात ऑनलाइन उपलब्ध आहेत. आणि या सगळ्यांमधून आपल्यावर वेगवेगळ्या माहितीचा मारा होतो आहे.......